..प्रुथ्वीची ऊत्पत्ती झाल्यानंतर हजारो लाखो वर्ष पशुपक्षी , जीवजंतु खुष होते कारण माणुसरुपी प्राणी अजून या प्रुथ्वीवर अवतरला नव्हता...माणसाच्या ऊत्पत्तीच्या अनेक भाकडकथा सांगितल्या जातात...कुणी म्हणतं मनु नावाच्या माणसापासून संपुर्ण मनुष्यजातीची ऊत्पत्ती झाली..कुणी म्हणतं अॅडम आणि ईव्ह ही पहिली सुरुवात..कुणाचं काय तर कुणाचं काय...ऊचलली जीभ लावली टाळ्याला...
यातलं काहीहि झालेलं नसणार...मनुष्यसद्रुष्य प्राण्याची ऊत्क्रांती होत होत तयार झालेली माणसाची ही जमात आणि हेच त्रिकालाबाधित सत्य आहे..
तर दोन माणसं एकत्र रहायला लागली...नावं घेऊन एकमेकाला बोलवायची पद्घत फार अलीकडची आहे त्यामुळे अॅडम ईव्ह किंवा मनु किंवा ईतरकाही नावं असण्याची सुतराम शक्यता नाही...तर दिसायला तुमच्या आमच्यासारखीच दोन माणसं एकत्र रहायला लागली..एक पुरुष आणि दुसरी स्त्री...आणि आज हा जो काही मानवजातीचा प्रपंच ऊभा आहे हा केवळ त्यांच्यात ऊद्भवलेल्या नैसर्गिक आकर्षणातून तयार झालेला आहे....
पण सुरुवातीला जेंव्हा संख्या कमी होती त्यावेळी सगळेच जणं एकत्र राहत होते कारण सगळ्यांसमोरच्या समस्या कमीअधिक प्रमाणात सारख्याच होत्या.. पुढे हळू हळू संख्या वाढू लागली तशी प्रत्येक गोष्टीत जीवघेणी स्पर्धा आणि पराकोटीचा संघर्ष सुरु झाला...आजच्यासारख्या अभ्यासाच्या परीक्षा नसतीलही त्याकाळात, परंतु पोटात रोज किमान तीन वेळा ऊठणारा पोटशूळ आणि वासनेसारख्या नैसर्गिक भावना पुरातन काळातदेखील होत्याच...आणि मग त्यातूनच होणारा तो struggle for existence...मग त्यात बलवान आले दुर्बल आले..मग बलवानांनी दुर्बलांचं शोषण नाही केलं तरंच नवल..
आजच्या काळातदेखील लाखो गोष्टींची ऊकल आपल्याला होत नाही...करोडो वर्षांपुर्वीदेखील ह्या अशा मानवी आकलनापलीकडच्या हजारो गोष्टी असणार आणि मग अशा गोष्टींच्या अस्तित्वासमोर हतबल होऊन पराभूत मनस्थितीने त्यांच्यासमोर नतमस्तक होऊन त्यांना दैवत्व दिलं गेलं...आता कुणाला सूर्यासमोर नतमस्तक व्हावं वाटलं तर कुणाला दगडामधे देव दिसला तर कुणी मानवी अवतारात देव शोधला...काय फरक पडतो..?? कारण सगळंच खोटं होतं किंवा आहे...
सुरुवातीला ही देव नावाची संकल्पना मानवी मनाला ऊभारी देणारी अनाकलनीय शक्ती म्हणून रूजवली गेली असणार पण नंतर काळाच्या ओघात तिचा बाजार झाला...शेवटी माणूसपण यातच आहे नाही का..?? मग माझा दगडातला देव तुमच्या माणसातल्या देवापेक्षा कसा मोठा आहे किंवा माझा माणसातला खोटा देव तुम्हा ईतर माणसांपेक्षा कसा श्रेष्ठ आहे याचे हेवेदावे सुरू झाले..धर्म तयार झाले,पंथ तयार झाले,देश विभागले गेले आणि नुकसान तुमचं आमचं झालं.भांडणं झाली,तंटे झाले,युद्ध झाली पण प्रश्न काही सुटेना कारण मानवानेच जन्माला घातलेला देव आज त्याच्यापेक्षाही वरचढ झाला होता मग ऊशीरा का होईना काही लोकांना समजून चुकलं की हे थोतांड आहे यात काही तथ्य नाही म्हणून त्यांनी देव वगैरे संकल्पनांना तडा देऊन नवीन पंथ स्थापले व आम्हीच कसे बरोबर व तुमच्या श्रद्घा कशा चुकीच्या हे सांगायला चालू केलं...म्हणजे पुन्हा तेच दुसर्याला स्वतःच्या मतांसमोर लाचार व्हायला लावणे...
जाताजाता सांगायचंच तर हिंदू,मुस्लिम,शीख,ख्रिश्चन या सर्व धर्मांमधे एकच साम्य आहे की हे सगळं धादांत खोटं आहे..लोकांच्या श्रद्धेचा बाजार मांडलाय सगळ्यांनीच..आमचाच देव खरा ईतर सगळे खोटे हे सांगणारे मूर्ख आणि त्यावर विश्वास ठेवणारे त्याहून अधिक मूर्ख..मी स्वतः गणपतीची आराधना करतो अगदी मनापासून पण तो माझा मित्र आहे..बोलतो माझ्याशी तो..त्याला प्रसन्न करण्यासाठी मी ऊगाच ऊपास तापास करत नाही किंवा तो ईतरांपेक्षा श्रेष्ठ आहे की नाही या वादातदेखील मी कधी पडत नाही...तुमची जिथे श्रद्धा जडलेय तिथे ती जरूर करा पण तिचा अतिरेक नको..ईतरांच्या श्रद्धेची निंदानालस्ती नको कारण हे आपण आपल्यासाठी बनवलंय आणि हे खोटं आहे...पुन्हा सांगतो हे खोटं आहे अगदी आटपाटनगरीत चौकट राजासारखं..स्वतःचा देव स्वतः शोधा आणि व्हा त्याचे भक्त पण तो ईतरांवर लादू नका..त्याला त्याचा देव स्वतः शोधूदेत...माणूस म्हणून जगा आईची आण घेऊन सांगतो खूप वाव आहे
यातलं काहीहि झालेलं नसणार...मनुष्यसद्रुष्य प्राण्याची ऊत्क्रांती होत होत तयार झालेली माणसाची ही जमात आणि हेच त्रिकालाबाधित सत्य आहे..
तर दोन माणसं एकत्र रहायला लागली...नावं घेऊन एकमेकाला बोलवायची पद्घत फार अलीकडची आहे त्यामुळे अॅडम ईव्ह किंवा मनु किंवा ईतरकाही नावं असण्याची सुतराम शक्यता नाही...तर दिसायला तुमच्या आमच्यासारखीच दोन माणसं एकत्र रहायला लागली..एक पुरुष आणि दुसरी स्त्री...आणि आज हा जो काही मानवजातीचा प्रपंच ऊभा आहे हा केवळ त्यांच्यात ऊद्भवलेल्या नैसर्गिक आकर्षणातून तयार झालेला आहे....
पण सुरुवातीला जेंव्हा संख्या कमी होती त्यावेळी सगळेच जणं एकत्र राहत होते कारण सगळ्यांसमोरच्या समस्या कमीअधिक प्रमाणात सारख्याच होत्या.. पुढे हळू हळू संख्या वाढू लागली तशी प्रत्येक गोष्टीत जीवघेणी स्पर्धा आणि पराकोटीचा संघर्ष सुरु झाला...आजच्यासारख्या अभ्यासाच्या परीक्षा नसतीलही त्याकाळात, परंतु पोटात रोज किमान तीन वेळा ऊठणारा पोटशूळ आणि वासनेसारख्या नैसर्गिक भावना पुरातन काळातदेखील होत्याच...आणि मग त्यातूनच होणारा तो struggle for existence...मग त्यात बलवान आले दुर्बल आले..मग बलवानांनी दुर्बलांचं शोषण नाही केलं तरंच नवल..
आजच्या काळातदेखील लाखो गोष्टींची ऊकल आपल्याला होत नाही...करोडो वर्षांपुर्वीदेखील ह्या अशा मानवी आकलनापलीकडच्या हजारो गोष्टी असणार आणि मग अशा गोष्टींच्या अस्तित्वासमोर हतबल होऊन पराभूत मनस्थितीने त्यांच्यासमोर नतमस्तक होऊन त्यांना दैवत्व दिलं गेलं...आता कुणाला सूर्यासमोर नतमस्तक व्हावं वाटलं तर कुणाला दगडामधे देव दिसला तर कुणी मानवी अवतारात देव शोधला...काय फरक पडतो..?? कारण सगळंच खोटं होतं किंवा आहे...
सुरुवातीला ही देव नावाची संकल्पना मानवी मनाला ऊभारी देणारी अनाकलनीय शक्ती म्हणून रूजवली गेली असणार पण नंतर काळाच्या ओघात तिचा बाजार झाला...शेवटी माणूसपण यातच आहे नाही का..?? मग माझा दगडातला देव तुमच्या माणसातल्या देवापेक्षा कसा मोठा आहे किंवा माझा माणसातला खोटा देव तुम्हा ईतर माणसांपेक्षा कसा श्रेष्ठ आहे याचे हेवेदावे सुरू झाले..धर्म तयार झाले,पंथ तयार झाले,देश विभागले गेले आणि नुकसान तुमचं आमचं झालं.भांडणं झाली,तंटे झाले,युद्ध झाली पण प्रश्न काही सुटेना कारण मानवानेच जन्माला घातलेला देव आज त्याच्यापेक्षाही वरचढ झाला होता मग ऊशीरा का होईना काही लोकांना समजून चुकलं की हे थोतांड आहे यात काही तथ्य नाही म्हणून त्यांनी देव वगैरे संकल्पनांना तडा देऊन नवीन पंथ स्थापले व आम्हीच कसे बरोबर व तुमच्या श्रद्घा कशा चुकीच्या हे सांगायला चालू केलं...म्हणजे पुन्हा तेच दुसर्याला स्वतःच्या मतांसमोर लाचार व्हायला लावणे...
जाताजाता सांगायचंच तर हिंदू,मुस्लिम,शीख,ख्रिश्चन या सर्व धर्मांमधे एकच साम्य आहे की हे सगळं धादांत खोटं आहे..लोकांच्या श्रद्धेचा बाजार मांडलाय सगळ्यांनीच..आमचाच देव खरा ईतर सगळे खोटे हे सांगणारे मूर्ख आणि त्यावर विश्वास ठेवणारे त्याहून अधिक मूर्ख..मी स्वतः गणपतीची आराधना करतो अगदी मनापासून पण तो माझा मित्र आहे..बोलतो माझ्याशी तो..त्याला प्रसन्न करण्यासाठी मी ऊगाच ऊपास तापास करत नाही किंवा तो ईतरांपेक्षा श्रेष्ठ आहे की नाही या वादातदेखील मी कधी पडत नाही...तुमची जिथे श्रद्धा जडलेय तिथे ती जरूर करा पण तिचा अतिरेक नको..ईतरांच्या श्रद्धेची निंदानालस्ती नको कारण हे आपण आपल्यासाठी बनवलंय आणि हे खोटं आहे...पुन्हा सांगतो हे खोटं आहे अगदी आटपाटनगरीत चौकट राजासारखं..स्वतःचा देव स्वतः शोधा आणि व्हा त्याचे भक्त पण तो ईतरांवर लादू नका..त्याला त्याचा देव स्वतः शोधूदेत...माणूस म्हणून जगा आईची आण घेऊन सांगतो खूप वाव आहे
©- निरागस