Monday, 21 May 2018

शिवाजी अंडरग्राऊंड ईन भीमनगर मोहल्ला

                                बर्‍याच दिवसांपासुन ऐकून होतो या नाटकाबद्दल,मला आजही आठवतंय.., सहा वर्षांपूर्वी जेंव्हा हे नाटंक रंगभूमीवर आलं,त्यावेळी काही प्रमाणात वादंग निर्माण झालेच होते,त्यावर मग दिग्दर्शक नंदू माधव,लेखंक राजकुमार तांगडे यांच्या मुलाखती व दिली गेलेली स्पष्टीकरणं ऐकून ऐकंदरीतंच खूप ऊत्सुकता निर्माण झाली होती नाटकाबद्दल..पण त्याकाळात  कोल्हापूरला काही हे नाटंक  आलं नाही व नंतर मी व्यस्त होऊन गेलो आणि नाटंक  काहीसं माझ्या स्म्रुती पटलामागे गेलं... काल मुंबईत मित्राकडून कळलं की नाटंक होणार आहे माटुंग्याला, मग मात्र वेळात वेळ काढून नाटंक पहायला गेलो...बर्‍याच लोकांनी ऐकलेलं असेलंच नाटकाबद्दल,तर काहींनी मुद्दामहून विनंती केली नाटकाबद्दल लिहिण्याची ,म्हणून केलेला हा प्रपंच...
                                  तर ऐकंदरीत नाटंक तुफान जमलंय...दोन अंकी असलेलं हे नाटंक सुपीक दिग्दर्शनामुळे अक्षरशः मनावर गारूड घालतं..नाटकाच्या लेखनाबद्दल माझे काही आक्षेप आहेतं,ते मांडीनंच मी पुढे, पण तरीही संहितेतील काही ढोबंळ  चुका सोडल्या ,तरी लेखंनही चांगलंच म्हणावं लागेल..आता येऊया नाटकातील पात्रांकडे..शिवाजी महाराजांना त्यांच्या विचारांसहित देवलोकी घेऊन ये, असं सांगून ईंद्रदेव यमाला प्रुथ्वीलोकावर पाठवतो आणि त्यांना शोधता शोधता यमाला कोणकोणत्या दिव्यांना सामोरं जावं लागतं,ते या नाटकात ऊद्ध्रुत करण्यात आलंय..राजांचं नाव वापरून राजकारण करणारे,पैसे कमावणारे लोक कसे भेटतात,शिवाजी महाराज हा विचार जातीभेदाच्या पलीकडे जाऊन समाजामधे किती दूरवर रूजला आहे,हिंदू,मुस्लिम,बौद्ध सारेच लोक या लोकराजाला कसं आपलं मानतात हे पटवून सांगण्याच्या  अवतीभोवती या नाटकाची संहिता फिरते...          
                                 काही मोजक्या ईतिहासकारांनी शाहिस्तेखान,अफजलखान,बाजीप्रभू देशपांडे,पन्हाळा,राजगड,राज्याभिषेक ईतक्याच स्वतःच्या फायद्याच्या गोष्टींपुरता ईतिहास रंगवून सांगितला..समर्थ रामदास महाराजांचे गुरू,दादोजी कोंडदेव महाराजांचे प्रशिक्षक वगैरे असत्य गोष्टी नकळंत ईतिहासाच्या नावाखाली आमच्या माथी मारल्या गेल्या आणि शिवा काशीद,ईब्राहिम खान,सिद्धी हिलाल यांना केवळ अनुल्लेखानं मारलं गेलं...महाराजांचं धोरण हे मुस्लिमांविरोधात कसं होतं हे वारंवार ऐतिहासिक पुस्तकांतून ,अगदी शालेय पाठ्यपुस्तकांतूनही आम्हाला वरचेवर सांगण्यात आलं..या चुकीच्या लिखाणावर या नाटकाच्या माध्यमातून भाष्य करण्यात आलंय,भाष्य नव्हे ,तर आसूड ओढण्यात आलेत असं म्हणायलाही हरकंत नाही...शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंवर त्यांचं नाव न घेता केलेली टीकादेखील सभाग्रुहात खच्चून टाळ्या मिळवून गेली, यावरूनंच लोकांच्या या मोडतोड करून सांगितलेल्या ईतिहासाबद्दल भावना किती तीव्र आहेत हे स्पष्टपणे सांगतात....
                                     महाराजांचं नाव घेऊन केला जाणारा बाजार,राजकारण व खोटेनाटं महाराजांचं नाव घेऊन, त्यामागून रेटवला जाणारा राजकीय पार्ट्यांचा हिंदू अजेंडा काही आम्हाला नवीन नाही...या नाटकाच्या निमित्ताने त्यावर परखड मत मांडण्यात आलंय..आणि त्यात लेखकाला यशही आलंय..नाटकात दोन शाहीरांमधली जुगलबंदी दाखविण्यात आली असून,त्यातला ऐक शाहीर ऊच्चवर्णीय हिंदू,  तर दुसरा बौद्ध धर्माचा असुन ऊच्चवर्णीय शाहीराचे अतर्क्य व ईतिहासाला धरून नसलेले ऐतिहासिक दावे तो आपल्या अभ्यासू व्रुत्तीने कसे परतावून लावतो,त्याच्या बोलण्यावर घातली घेतलेली बंधनं झुगारून ,त्याच्या स्वतःच्या भीमनगर मोहल्यामधे तो ऊच्चवर्णीय शाहीराचं आव्हान लिलंया कसं परतावून लावतो हे खरंच खूप प्रेक्षणीय पद्धतीने रंगविण्यात आलंय..या सगळ्या झाल्या नाटकाच्या जमेच्या बाजू..आता तर्काला न पटणार्‍या बाजू..
                                  संपूर्ण नाटकाची थीम ब्राह्मणविरोधी असून,आमच्यावर ब्राह्मणांनी कसा अत्याचार केला व आमचं कसं शोषंण करण्यात आलं हा आणि हाच नाटकाचा गाभा आहे...शिवाजी महाराजांच्या ईतिहासाच्या विद्रुपीकरणाचं नाव पुढे करून, ब्राह्मण समाजावर थेट टीका करण्याची कोणतीही संधी लेखकाने वाया घालवलेली नाहि...शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंवर नाव न घेता केलेली टीका मी समजू शकतो,पण ऐवढ्या मोठ्या व्यासपीठावर हजारो लोकांच्या साक्षीने विशिष्ठ समाजाचं थेट नाव घेऊन टीका करणं माझ्यासारख्या जातीभेद न मानणार्‍या माणसाला पटलं नाही,आणि हे संपुर्ण नाटकात वारंवार झालं किंवा ठरवून करण्यात आलं...सामाजीक जीवनात जातीभेद करणं जर गुन्हा असेल, तर हे असं विशिष्ठ समाजाचं नाव घेऊन संपूर्ण समाजालाच दूषंण देणं तरी आपण कसं आणि का योग्य मानायचं..?? जातीयवादाचं हे ओगाळवाणं प्रदर्शन तुर्तास संविधानाच्या चौकटीत जरी बसंत असलं, तरी नैतिकतेच्या चौकटीत बसणारं नव्हतं...आपला मुददा बरोबर असेलही कदाचित ,पण व्यक्त होण्याची पद्धत काही ठिकाणी अतिशय चुकीची होती...अशाप्रकारची जातीयवादी टीका मराठ्यांवर केली असती ,तर निश्चित तोडफोड झाली असती,नाटंक बंद पाडलं असतं,ईतरांवर टीका केली असती तर भसाभस अॅट्राॅसिटीचे गुन्हे दाखल झाले असते,ब्राह्मण समाजावर नाव घेऊन थेट टीका करूनदेखील, हे नाटंक आज सहा वर्षै रंगभूमीवर आहे हा या समाजाचा समजूतदारपणा नक्कीच कौतुकास्पद म्हणावा लागेल..
                                  दुसरी गोष्ट, शिवरायांचं नाव घेऊन जसं राजकारंण केलं जातं, तितकंच किंबहूना त्याहून अधिक राजकारंण बाबासाहेबांचं नाव घेऊन केलं जातं,त्यावर दुर्दैवाने नाटकामधे ऐकही अवाक्षर काढण्यात आलेलं नाही..सगळ्याच जाती धर्मामधे महापुरूषांच्या नावावर चालणार्‍या राजकारणावर भाष्य करण्याची ऐक चांगली संधी लेखकाने या निमित्ताने वाया घालवली, असं मला वाटतं आणि त्यामुळेच काही काही ठिकाणी हे नाटंक मला अगदीच ऐककल्ली 'ब्राह्मण झोडा ' या चळवळीचा भाग वाटतं आणि म्हणूनंच ईतकं चांगलं नाटंक, आजही समाजातल्या सर्व थरांमधे सर्वदूर पोहोचलेलं नाही ,हे पहायला जमलेल्या लोकांवर ऐक नजंर टाकली की लगेच कळेल...शिवरायांच्या काळातील मुस्लिम समाजातील शूरवीर सरदारांची ऊदाहरणं देऊन मुस्लिम समाज हिंदूविरोधी नसल्याचा व शिवरायांची युद्धनीती ही मुस्लिमविरोधी नव्हती हे पटवून देण्यात मात्र लेखंक कमालीचा यशस्वी झालाय ही त्यातल्या त्यात जमेची बाजू...
                                      संभाजीमहाराजांना औरंगजेबाने हालहाल करून मारलं,त्याची कारणं वेगळी होती...त्यांची जीभ कापणे,कानात शिसं ओतणे,डोळे फोडणे या सार्‍या गोष्टी, त्यांचं व पर्यायाने त्यांच्यासाठी लढणार्‍या मराठी मावळ्यांचं मनोधैर्य खच्ची करण्यासाठी केल्या गेल्या...त्याचा वैदिक पद्धतीशी संबंध जोडणार्‍या विचारधारेचा प्रा संजय सोनवणींसारख्या अनेक ईतिहासकारांनी प्रखरतेने विरोध केलाय....ईतकं मोठं साम्राज्य हाकणारा मुस्लिम हुकुमशहा औरंगजेब संभाजीराजांचा खून काही तात्कालीन ब्राह्मणवर्गाचं ऐकून वैदिक पद्धतीने करेल, असा तर्क लावणं म्हणजे अगदीच ओढूणताणून शब्दांशी बुद्धिबळ खेळण्यासारखं आहे आणि याला कोणताही ऐतिहासिक पुरावा ऊपलब्ध नाही...चुकीचा ईतिहास खोडून काढणं गरजेचं आहेच ,पण ऐका चुकीच्या ईतिहासाला खोडण्यासाठी दुसरा चुकीचा ईतिहास पुढे रेटणं, ही अक्षम्य चूक या नाटकात लेखकाकडून झालीये...
                                 जाता जाता फक्त ऐवढंच सांगतो...चारशे वर्षांपुर्वी भारंत हा देश अस्तित्वात नव्हता,१५ आॅगस्ट १९४७ रोजी भारत नावाचा देश अस्तित्वात आला आणि २६ जानेवारी १९५॰ साली तो संविधानाने बांधला गेला...संविधानानुसार जातीभेद अमान्य असून प्रत्येक भारतीय नागरीकाला समान हक्क,अधिकार व कर्तव्ये बहाल करण्यात आली आहेत....१९४७  सालापुर्वी झालेल्या अन्यायाचा,शोषणाचा या देशाशी काहीही संबंध नाही. राजेराजवाड्यांची वर परलोकी भेट झाली की त्यांच्याकडून याचा हिशोब मागा...क्रुपा करून शेकडो वर्षांपूर्वी झालेल्या जुन्या हेवेदाव्यांची,झालेल्या हेळसांडीची ऊत्तरं या संघराज्यात शोधू नका...कारण यातून साध्य काहीच होणार नाही,ऊलंट जातीभेद वाढीस लागून आपापसातलं सौहार्द्य नष्ट होईल...
या सगळ्या जमेच्या व कमकुवंत बाजू असूनही नाटंक मात्र प्रेक्षणीय व आवर्जून पहाण्यासारखं मात्र नक्कीच झालंय...बघा तरं काय म्हणायचंय लेखकाला...!! its a real must watch..
                                             -©- निरागस


No comments:

Post a Comment