Saturday, 27 October 2018

आरक्षण - काल आज आणि ऊद्या

                               ५८ मूकमोर्चे काढून संपूर्ण मराठा समाज आपल्या न्याय्य मागण्या घेऊन रस्त्यावर ऊतरला, महाराष्ट्र सरकार गुढग्यावर रांगंत चर्चेसाठी आलंच पण संपूर्ण  देशानेच नाही तर जगाने कौतुक केलं...ईतिहासात यापूर्वी असं कुठेही झालं नव्हतं आणि कदाचित यापुढेही होणार नाही...सगळंच कसं " न भूतो न भविष्यती..!! " अशा प्रकारचं वातावरण..जिकडे बघावं तिकडे भगवा महासागर..मुंबईतल्या मोर्चात मीही सहभागी झालो,फेसबूकवर लिहीत राहीलो,विरोधकांचं बौद्धिक घेत राहिलो आणि अनेकांच्या भूवया ऊंचावल्या....डाॅक्टर आपलं तर शिक्षण पूर्ण झालं,चांगली नोकरीही आहे हाती आता कशाला हवंय आरक्षण आपल्याला...?? म्हणून हा लिखाणाचा प्रपंच
                              आधी मुळापासून विषंय समजून घेऊयात...मराठा ही ओळंख मला कुणी दिली...?? जन्मतःच मला याबद्दल काही माहिती होतं का ...?? तर नाही, माझ्या घरातही मला असं कुणीही कधी सांगितलं नाही ,कारंण घरात अशा विचारांची वाच्यताच कधी झाली नाही...ईयत्ता चौथीपर्यंत परीक्षेचे फाॅर्म्स सुद्धा शाळेतला मास्तरंच भरायचा आणि त्यामुळे तोवरही यासगळ्याचा कधीच काहीच संबंध आला नाही...आजूबाजूला शिकणारी सगळीच मुलं ऐकसारखी असायची..जेवणाच्या सुट्टीत ऐकत्र बसून जेवताना,मधल्या सुटटीत ऐकत्र खेळताना,दंगा मस्ती करताना कोण कुठल्या जातीचा,धर्माचा अथवा पंथाचा आहे याची पुसटशीदेखील कल्पना आली नाही..सगळीकडे कसा आनंदीआनंद...
                                 मग असाच सरकत सरकत ईयत्ता पाचवीमधे गेलो..कागदावर मोठा झालो ,शाळा बदलली आणि पहिल्यांदा प्रवेश घेण्यासाठीच्या फाॅर्मवर जात आडवी आली...मला आजही आठवतंय, घरी जाऊन मी वडिलांना प्रश्न विचारला होता,ईथे काय लिहू म्हणून...? कारंण काही माहितीच नव्हतं यातलं...ईथवर येताना कधी संबंधच आला नाही या असल्या गोष्टींशी किंवा गरंजही पडली नाही...मग तिथून पुढे पुन्हा काही दिवंस जात हे प्रकरंण दरवर्षी फक्त परीक्षेच्या फाॅर्मवर लिहिण्यापूरतंच संकुचित राहून गेलं...नाही म्हणायला वर्गातल्या काही मुलांना पुस्तकं मोफंत मिळायची,त्यांची परीक्षेची फी माफ व्हायची,गरंज नसताना, न मागता त्यांना स्काॅलरशीपही मिळायची....कधीकधी वाटायचं आपल्याला कधीच कसं काही मिळंत नाही...?? आपण शिक्षकांचे नावडते वगैरे आहोत का...?? असा प्रश्न नेहमी पडायचा..पण ऐका बाजूला मित्रांसाठी आनंदही वाटायचा...हे असं अगदी बारावी पर्यंत चाललं...आरक्षण,सरकार,जातीव्यवस्था यांचा तोवरही कुठे संबंध आला नव्हता...त्यासाठी mbbs ऊजडावं लागलं...
                                     मेहनत करून जीवापाड अभ्यास केला...२॰॰ गुणांची परीक्षा असायची आमच्यावेळी.. १८६ गुण आणले,कोल्हापूरच्या सरकारी महाविद्यालयात प्रवेश घेतला...माझ्या कित्येक जवळच्या मित्रांना १८२-१८४ गुण असूनही mbbs ला प्रवेश मिळाला नाही...त्यांचं सांत्वन केलं आणि माझा डाॅक्टरकीचा प्रवास सुरू झाला...वर्गात असणारे सगळेच आमचे मित्र,तेंंव्हाही होते ,आजही आहेत...मग ऐकेदिवशी ऐका मित्राबरोबर बोलता बोलता सहंज त्याला त्याचे गुण विचारले,तर किती असावेत गुण ११॰...२॰॰ पैकी अवघे ११॰...दीड हजारचा मोबाईल घेऊन द्यायला जेंव्हा माझ्या बापाला जड गेलं होतं,तेंव्हा याच्याकडे तीस तीस हजारांचे फोन असायचे,आणायला आणि सोडायला गाडी असायची..घरी नोकरचाकरांची रेलचेल...माझ्या पायाखालची जमीनच सरकली डोक्यावर आभाळ तेवढं कोसळायचं शिल्लंक राहिलं होतं..
                          माझे अनेक मित्र कष्टातून वर आलेले,शेती करंत ,हमाली करंत ,हाॅटेलात भांडी घासंत शिकणारे होते,पण त्यांची अभ्यासक्रमाची फी कधी माफ झाली नाही,त्यांना कधीही मोफंत पुस्तकं मिळाली नाहीत ,की कमी मार्कांमधे प्रवेशही मिळाला नाही.. असे अनेक मित्र सरकन माझ्या डोळ्यांसमोरून गेले आणि त्यावेळी  मला आरक्षणा नावाच्या या विषयाची सर्वप्रथम जाणीव झाली...मग पुढे प्रत्येक क्षणी,पावलोपावली अनेकविध द्रुष्टांत झाले आणि ऐकंदरीत सगळं प्रकरण डोळ्यांसमोर स्पष्ट झालं....यातल्या कित्येक मुलांनी नंतर वेळोवेळी mbbs करता करता गटांगळ्या खाल्या...काही दोन दोन वेळा परीक्षा देऊन पास झाले तर काहींच्या वार्‍या अजूनही सुरूच आहेत...तर असो..!! वर म्हटल्याप्रमाणे आजही ते माझेच मित्र आहेत आणि आजही मला ते तितकेच जवळचे आहेत...कुणाला कमी लेखणे हा माझा हेतू नसून,जातीव्यवस्था समूळ नष्ट करणे हा आणि हाच माझा ऊदात्त हैतू आहे....
                           mbbs पास झालो आणि पुढच्या शिक्षणालादेखील तेच झालं,पुन्हा तेच आरक्षण..या अशाच स्पर्धैमधून पुढे शिकलो स्त्रीरोगतज्ञ झालो, तर परंत नोकर्‍यांमधे आरक्षण....म्हणजे प्रत्येक ठिकाणी जातीनिहाय वर्गवारी अनिर्वाय....तू अमक्या जातीचा,तू अमक्या धर्माचा म्हणून आमच्यात वेळोवेळी वर्गवारी..याला काय अर्थ आहे...?? म्हणजे आधी MBBS ला प्रवेश घेताना आरक्षण,नंतर PG ला प्रवेश, घेताना आरक्षण,त्यानंतर नोकरी मिळंवताना,नोकरीमधे बढंती मिळंवताना आरक्षण आणि दुसरा ऐखादा होतकरू विद्यार्थी ज्याला दोनवेळ जेवायची भ्रांत,अभ्यासाला धड पुस्तकं नाहीत की डोक्यावर नीट छप्पर नाही..त्याला मात्र सरकारकडून कोणतीही मदंत नाही...माझ्या बुद्धीच्या बाहेर आहे सगळं हे...
                                 सगळ्यांनाच मुळात जातीनिहाय आरक्षण चुकीचं आहे हे पटतंय, पण कुणी त्याविरूद्ध बोलायला धजावंत नाहीये..याची कारणं तशी अनेक आहेत,पण सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे राजकारण्यांना असलेली मतांची भीती..वर्षानुवर्षे सुरू राहिलेलं जातीनिहाय आरक्षण बंद करून राजकारणी लोक ठराविक मतदारांचा रोष पत्करायलाअजिबात धजावंत नाहीत...मग यातून सरळ साधा मधला मार्ग काढायचा प्रयत्न सुरू आहे,जो मागेल त्याला आरक्षण...!! पण कोर्टाच्या किंवा संविधानाच्या कसोटीवर हा निकष ऊतरणारा आहे का..?? याचा कोणीही विचार करीत नाही...निवडणुका जवळ आल्या की अध्यादेश,वटहुकूम काढून लोकांची निव्वळ फसवणुक केली जाते...तेवढ्यापुर्ती मतं मिळवायची आणि नंतर मात्र सारं खापंर कोर्टावर ढकलून मोकळं व्हायचं हे आता फारकाळ चालणार नाही.. महाराष्ट्रात मराठा,तिकडे हरियाणात गुर्जर,गुजरातेत पाटीदार समाज रस्त्यावर ऊतरण्यामागची कारणं राजकीय नसून सामाजिक विषमतेत आहेत..यावर काहीतरी ठोस मार्ग आपल्याला काढावाच लागेल नाहितर ऐक ना ऐकदिवस लोकांच्या सहनशीलतेचा अंत होईलंच आणि मग जो ऊद्रेक होईल त्याची जबाबदारी कोण घेईल कोर्ट की सरकार..??
                                      सरकारी महाविद्यालयातून शिकताना,किंवा शिकल्यानंतर नोकरी मिळविताना आरक्षणाच्या नावाखाली जो भेदभाव केला जातौ तो मी स्वतः अगदी जवळून अनुभवलाय,पण तरीही आजही मला कुणाविरोधात काहीही म्हणायचं नाहिये..ज्यांना ज्यांना आरक्षणाच्या माध्यमातून शिक्षणाची संधी ऊपलब्ध झाली अशांचं मी अभिनंदनच करतो ,मग ते श्रीमंत असौत वा गरीब,कारण आपापसात भांडणं किंवा ऐकमैकांना कमीपणा दाखवून हीन वागणूक देणे हा अजिबात माझा ऊद्देश नाही..सगळे आपलेच आहेत..पण मला काळजी वाटते ती अशा गरीब विद्यार्थ्यांची की ज्यांना दिवसभर श्रम केल्याशिवाय दोनवेळचं जेवण मिळंत नाही,अभ्यासाची पुस्तकं खरेदी करण्याची ज्यांची ऐपत नाही आणि जे जातीने मराठा,ब्राह्मण अथवा ईतर सो काॅल्ड खुल्या वर्गात मोडंत असल्याने ज्यांना आरक्षणही ऊपलब्ध नाही...अशा गरजुंनी आयुष्यात शिकायचंच नाही का..?? अशांनी आयुष्यभर गरीबीतंच खितपत पडायचं का..?? खुल्या वर्गातील या अशा गरीब गरजू विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची दारं कधी ऊघडणार..??ईतरांसारख्या समान संधी या वर्गातील गरीबांना का ऊपलब्ध करून दिल्या जात नाहीत...??
                                     गरीब,मागासलेल्या लोकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे, हा आणि हाच आरक्षणाचा मुख्य हेतू होता आणि तोच असायला हवा...पन्नास शंभर वर्षांपूर्वी कदाचित मागासलेपण जातीनिहाय वर्गवारीनुसार ठरवलं जाऊ शकंत असेल,पण आजच्या जगात मागासलेपणाचं मोजमाप जातीनिहाय करणं किती संयुक्तिक आहे..?? कित्यैक लोकांनी आरक्षणाचा फायदा घेऊन यशाची अनैकविध शिखरं पादाक्रांत केली..कुणी डाॅक्टर,ईंजिनिअर झालं,तर कुणी सरकारी नोकरीत मोठ्या हुद्यांवर पोहोचलं,आनंदच आहे..पण त्यांच्या मुलांना,त्यांच्या मुलांच्या मुलांना आरक्षणाची खरंच गरज आहे का..?? त्यांच्याऐवजी आपल्याच समाजातील ईतर गरीबांना मग ते कोणत्याही जातीधर्माचे असोत ज्यांची आर्थिक परिस्थिती अतिशय बेताची आहे, अशांना आरक्षण देण्याबाबत आपण थोडातरी विचार करणार आहोत की नाही..??

बघा पटतंय का...?? आपल्यासमोर मुद्दा मांडणं , आपल्याला विचार करायला भाग पाडणं हाच नेहमी माझा ऊद्देश असतो,विचार करा आणि पटलं तर या मोहिमेत नक्की सहभागी व्हा..!!
                                               -©- निरागस

                               
           

No comments:

Post a Comment