" लोकं मला विचारतात , तू निषेध का नाही करत डाॅक्टरांच्या मारहाणीचा..?? का नाहि लिहित यावर..?? का नाही बोलत यावर..?? म्हणून लिहायला घेतलं..!! तटस्थपणे लिहिणं अपेक्षित आहे पण तसं न करता मुद्दाम डाॅक्टर म्हणून आत्मपरीक्षण करून लिहितोय... बघा पटतंय का..!!
स्वतः डाॅक्टर असूनदेखील मी या मारहाणीच्या गोष्टी गांभीर्याने घेत आलेलो नाही ..कारणे अनेक आहेत...पहिलं म्हणजे सरकारलेखी कुचकामी असलेले आपले कायदे., प्रत्येक कायद्याला असलेली पळवाट आणि दुसरं म्हणजे या सगळ्या घटना म्हणजे लोकांच्या मनात डाॅक्टरांविरोधात असलेल्या संतापातून ऊद्भवलेला प्रतिकात्मक विरोध असल्याने , केवळ मोर्चे काढून,निषेध व्यक्त करून,कायदे कडक करून हा विषय सुटण्यातला नाही याचं मला ऊशीराने का होईना पण झालेलं आकलन..
वीस वर्षांपुर्वी डाॅक्टर म्हणजे निर्विवाद देव होता..त्याच्यावर लोकांचा विश्वास होता..डाॅक्टरचा शब्द प्रमाण मानला जात होता..मग मागील वीस वर्षात डाॅक्टरची पत ईतकी कशी घसरली...?? कारण डाॅक्टरांनी आपल्या ज्ञानाचा बाजार मांडला...रूग्ण आणि डाॅक्टर यांमधे पैसे सोडून दुसरं नातंच तयार होणं बंद झालं..भाव- भावना,विचारपूस, आपुलकी या गोष्टी केंव्हाच मागे पडल्या आणि या सगळ्या गोष्टींची जागा घेतली पैशाने..मग यातून नवीन नवीन मोठमोठाले दवाखाने निघू लागले...दवाखाने कुठले.. लोकांच्या आजाराची,त्यांच्या भीतीची कुचंबणा करणारे अशक्य असे कत्तलखाने निघू लागले...लोकांना छोट्यामोठ्या गोष्टींसाठी घाबरवून त्यांच्याकडून पैसे ऊकळले जाऊ लागले...अर्थात लोकांसाठी निस्वार्थिपणे झटणारी चांगल्या डाॅक्टरांची एक सुपीक जमात आजही अस्तित्वात आहे..पण या ईतर व्यापार्यांच्या झगमगाटात ती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे....
मग ईतके पैसे ओतूनदेखील परिणामकारक ऊपचार मिळेनासे झाले,रोग बरा झाला तरी मानसिक समाधान मिळेणासं झालं..यातून येणारं नैराष्य,आगतिकता यातून डाॅक्टरांचं जनमानसातलं चित्र बिघडू लागलं...मग हा वर्षानुवर्षे दबलेला असंतोष कसा बाहेर पडणार..?? एव्हाना डाॅक्टर आपलं देवपण गमावून बसला होता...मोठमोठाले डाॅक्टर असंतोष बोलून दाखवायला,शंका निरसन करायला ऊपलब्ध नसल्याने, सरकारी दवाखान्यात ऊपलब्ध होणार्या त्या गरीब बिचार्या junior डाॅक्टरांवर सगळा राग बाहेर पडू लागला..राग व्यक्त करायची प्रत्येकाची कुवत आणि ताकद वेगवेगळी असल्याने अस्रुजनशील लोकांकडून मारहाणीचे प्रकार घडू लागले...
आता दुसरी बाजू,सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांचं कामकाज माहिती नसणार्यांनी एकदा त्याला अवश्य भेट द्या..mbbs करून पुढील शिक्षण घेणारा डाॅक्टर तिथे गाढवासारखं काम करत असतो,त्याला त्याबदल्यात क्षुल्लक मोबदला दिला जातो..ऐका खोलीत दहा दहा,पंधरा पंधरा डाॅक्टर कोंबले जातात,कित्यैकांना झोपायला बैडदेखील पुरवले जात नाहीत,कामाच्या तासांबद्दल तर न बोललेलंच बरं..,चार चार दिवस यांना झोपायला वेळ मिळंत नाही,सकस आहार मिळंत नाही,आंघोळीला पाणी मिळंत नाही..,प्रत्यैक डाॅक्टरला करावं लागणारं वैयक्तिक काम हे त्याच्या कमाला मर्यादेपेक्षा कित्येक पटीने जास्त असतं...कामाच्या या बोजात ईतरांच्या आरोग्याची काळजी घेणारा डाॅक्टर शारिरीक व मानसिक द्रुष्ट्या स्वतःमात्र खंगला जातो..आणि अशा डाॅक्टरकडून आपण एखाद्या superhero सारखं चोवीस तास दूध देणार्या गाईसारखं कामाची अपेक्षा करतो..जे कागदावरदेखील शक्य नाही...,!!
बरं नुसते प्रश्न निर्माण करून काय ऊपयोग..?? त्यांची ऊत्तरदेखील सुचवतो..
१ ) सरकारी आणि खाजगी रूग्णालयं दोघांमधली तफावत कमी केली गेली पाहिजे..खाजगी रूग्णालयांच्या मनमानी कारभारावर सरकारने चाप आणला पाहिजे,
२) अत्यावश्यक सेवा जसं की बाळंतपण,काही अत्यावश्यक शस्रक्रिया यांच्या किंमती सरकारने नियमित करून द्याव्यात...आणि त्या स्वतःच्या नियंत्रणात ठेवाव्यात जेणेकरून सरकारी दवाखान्यांमधली अनावश्यक गर्दी कमी होईल,आणि गरीबातल्या गरीब लोकांपर्यंत सर्व वैद्यकीय सुविधा पोचवता येतील...
३) वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या वाढविण्यात यावी...जास्तीत जास्त डाॅक्टर तयार करून डाॅक्टर पेशंट तफावत कमी होण्याच्या द्रुष्टीने पावले ऊचलावीत..
४) डाॅक्टरांना योग्य वेतन व ईतर सुविधा पुरविण्यात याव्यात,प्रसंगी कोणताही अनुचित प्रकार घडला तरी डाॅक्टरांच्या संपूर्ण सुरक्षेची हमी सरकारने घ्यावी
५) शेवटचं आणि सगळ्यात महत्वाचं..!! डाॅक्टरांच्या अभ्यासक्रमात लोकांशी कसं बोलावं,त्यांना कसं हाताळावं,ऐखादी अप्रिय घटना त्यांना कोणत्या भाषेत,कोणत्या वेळी सांगावी या सगळ्या बाबींचा समावेश केला गेला पाहिजे..नुसतेच पुस्तकी किडे बनून निघणारे डाॅक्टर सामाजिक आरोग्य कधीच सुधारू शकणार नाहीत..त्यांना जबाबदारीचा,सामाजिक आत्मियतेचा पैलू पाडणारं वैद्यकीय शिक्षण आपल्याला तयार करावं लागेल...
( निषेध करणार्यांनी नक्कीच निषेध करावा, पण त्यामागील मूळ कारण जाणून न घेता नुसतीच स्वतःची बाजू ऊचलून धरणं डाॅक्टरांसारख्या वैचारीक जमातीला शोभून दिसतं का..?? याचा दूरवर कुठेतरी विचार होण गरजेचं आहे...कित्येक डाॅक्टरांच्या भावना दुखावतीलही कदाचित...त्यांना एवढंच सांगतो..prevention is better than cure हा मूलमंत्र आपणंच दिलाय ना जगाला...!! )
-©- निरागस