Wednesday, 23 November 2016

हवंय फक्त कागद,पेन आणि एकटेपण....

                                     हवंय फक्त कागद,पेन आणि एकटेपण....


लहानपण तेवढं बरं होतं...जे मागेल ते मिळत होतं..
दमून भागून सायंकाळी , लेकरु कुशीत आईच्या विसावत होतं..
नव्हता होत रोज रोज कुणाबरोबर तंटा..
सगळे प्रश्न संपायचे, जेंव्हा वाजायची शाळेची घंटा...

नाही राहिली ती गंमत..नाही राहिलं ते बालपण..
आता मात्र हवंय फक्त कागद,पेन आणि एकटेपण...


पुस्तकांनी भरलेल्या या दप्तरात हरवलं माझं निरागसपण...
आता नाही सुटका , फसलो रे मित्रा तु पण आणि मी पण..
खेळण्यांची ,फुग्यांची नव्हे तर पुस्तकांची असते मोठ्यांची जत्रा...
मन माझं झालंय कासावीस अन् जीव झालाय माझा भित्रा..

नाहि राहिली ती ऊमेद नको झालंय हे तरुणपण
आता मात्र हवंय फक्त कागद,पेन आणि एकटेपण...


नको त्या महागड्या गाड्या..,नको ती रोजची वर्दळ..
हरवत चाललाय बागेमधून चाफ्याचा तो दरवळ..
ऊत्तरं शोधता शोधता वर्ष चालली सरत...
कधीतरी येतील काहो आयुष्यातले हे दिवस परत..???

नाही राहिली आपसातली ती आपुलकी..नाही राहिलं ते आपलंपण..
आता मात्र हवंय फक्त कागद,पेन आणि एकटेपण...


रोज शांततेच्या शोधात घराबाहेर मी निघतो...
भांबावलेल्या नजरेने आकाशाकडे मी बघतो..
सुर्यदेखील आजकाल माझ्याकडे बघून हसत नाही...
त्याला तरी काय दोष देणार..??..त्याचीच दुरावस्था माझ्याकडून बघवली जात नाही...

नाही राहिली ती ध्येयासक्ती , हाती ऊरलंय ते फक्त म्हातारपण
आता मात्र हवंय फक्त कागद,पेन आणि एकटेपण...
                                                                                
                                                                                            - निरागस


No comments:

Post a Comment